लेखक : उन्मेष गुजराथी
23 Jul, 2022

सरकारच्या तिजोरीत चिल्लर, नेत्यांकडे मात्र घबाड
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
भाजपला विरोध करणाऱ्यांवर या कारवाया होत आहेत. देशातील बिझनेसमन लोकांकडून पैसे गोळा करणे व पुढाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायला लावणे, हेच जणू या तपास यंत्रणांचे काम झाले आहे. यातून अरबो रुपयांची काळी माया भाजपकडे जमा होत आहे. या पैशाचा वापर करून लोकप्रतिनिधी फोडणे, निवडणूका लढवणे, यासाठी केला जात आहे.
मोदी व शहा यांच्या कारकिर्दीत विशेषतः इडीने किती जणांना नोटीस पाठविल्या, याची माहिती अद्याप दिली जात नाही. याबाबत माहितीचा अधिकार वापरला गेला असता, ती माहितीही चक्क नाकारण्यात आली. वास्तविक हीच माहिती इडीच्या वेबसाईटवर दाखविण्यात यायला हवी होती. मात्र केंद्र सरकारने ही माहिती दडवून ठेवली आहे.
याच तपास यंत्रणांचा गैरवापर जितेंद्र नवलानी सारख्या अधिकाऱ्यांनी केला होता. व यातून अक्षरश: कोट्यवधी रुपये भाजप नेत्यांना गोळा करून दिले, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमची स्थापना करण्यात आलेली होती. या वसुली रॅकेटसंबंधी सर्वच संशयित अधिकाऱ्यांना अटक होणार होती. मात्र याआधीच महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिंदे फडणवीस म्हणजेच भाजपचे सरकार बेकायदेशीररीत्या स्थापन झाले. आणि अवघ्या काही तासातच ही चौकशी बंद करण्यात आली व पांडे यांच्यावर इडीची कारवाई करून तात्काळ अटक करण्यात आली.
भाजपच्या या केंद्रीय तपास यंत्रणांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीनेही मुंबई पोलीस, महिला आयोग या यंत्रणा वापरल्या. मराठी मधील एका टिनपाट नटीला केवळ सोशल मिडीवरील पोस्ट शेअर केली म्हणून ४० दिवस तुरुंगात डांबले, असा दुरुपयोग केल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र यानिमित्ताने तपास यंत्रणांचा खुबीने वापर करून राजकारणातील शह काटशह खेळण्याचा जंगली पायंडा पडलेला आहे.
याआधी कांग्रेसनेही तपास यंत्रणाचा दुरुपयोग केला होता, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केले व पचवलेही होते. त्यामुळे जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवले. मात्र जे साठ वर्षांत काँग्रेसला जमले नाही, त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने भ्रष्टाचार व शासकीय यंत्रणाचा गैरवापर हा मोदी – शहा ही जोडगोळी भारतात करवून दाखवत आहे. मोदी – शहा यांनी भाजपमधील ‘पावित्र्य’ केव्हाच घालवलेले आहे आणि भाजपची केव्हाच ‘काँग्रेस’ करून ठेवलेली आहे.
अर्थात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आलेला नाही, त्यामुळे उद्या विरोधकही सत्तेवर बसतील. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ‘पुलवामा’ घडवून आणणे , ४० ते ५० आमदार, खासदार यांना एकाच वेळी भय अथवा अमिश दाखवून विकत घेणे व लोकशाहीला झुगारून देत सत्ता काबीज करणे, त्यांच्या भ्रष्ट कारकिर्दीला क्लीन चिट देणे, हा पायंडा भारतासारख्या सुसंस्कारित देशासाठी अत्यंत घातक आहे. आगामी काळात विरोधक याहीपेक्षा अधिक तीव्रतेने या विघातक बाबींचा वापर करतील व त्यामुळे भारत आणखी रसातळाला जाण्याची शक्यता आहे.


संबंधित लेख व घडामोडी
GST Evasion Scandal Unearthed in Hiranandani Group Housing Societies
Sprouts Special Investigation Team, Led by Unmesh Gujarathi, Exposes Tax Fraud Unmesh Gujarathi Sprouts News Exclusive The Sprouts Special Investigation Team (SIT), under the leadership of investigative journalist Unmesh Gujarathi, has unveiled a significant GST...
Will US Consulate Act Against Fake Paper Universities?
Sprouts SIT's Exclusive Expose on Fake Doctorates Unmesh Gujarathi Sprouts Exclusive Mumbai's most trusted newspaper, Sprouts, through its Sprouts Special Investigation Team, has uncovered a disturbing trend: the rise of fraudulent 'paper universities' in India...
Over 15,000 Investors Defrauded of ₹500 Crore
Key Accused Absconding for 8 Months Unmesh Gujarathi Sprouts Exclusive A massive investment fraud involving over 15,000 investors and more than ₹500 crore has come to light. Investors were lured into investing in cryptocurrency with the promise that the company would...
अर्थकारणाला वाहिलेलं ह्या पोर्टलवरून अर्थविश्वातील प्रत्येक क्षणाची घडामोड जाणून घेण्यासाठी
आमची समाजमाध्यमं
Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque